सायंकाळच्या किरणांसारखे
शब्द आक्रसुन घेतात अर्थ
सारी भावना वितळत जाते
मौनाच्या अंधारात...
अन कविता होते व्यर्थ!
रात्रीच्या जगात उरतात जसे निस्तेज आकार..
तसे शब्दांचे अर्थहिन आकार
नुसतेच कागदावर साकार
तेव्हा वाट पहावीच लागते उजाडायची...!!!
Wednesday 26 September 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment