Wednesday 26 September 2007

कुछ लम्हे



  • वक्त के साथ तनहाई से दोस्ती हो गयी

हालत ने हात पकडा दिया

बेचारी क्या करती..

जिंदगी निभाती चली गयी...!!!




  • जिंदिगीको खयालोमे कुछ ऐसे देखा था

कभी फ़ुल तो कभी मोती पिरोया था

सामने जब आयी तो अलगही अंदाज था

बस एक बारही उसने पलट के देखा था!!!




  • जिंदगीको समझने से क्या होता था

काश एक बार अपनेही आखो मे झाका होता

जिंदगी वही मिल जाती उन चमकती दुनिया्में

जो सपने देखकर मस्त रह्ती है अपनी दुनिया में...!!!!




  • गम सहा न गया तो छलक पडी आखें..

सुख मे भी यही रवैय्या अपनाती है ये आखें

पता नही मै कब सिखुंगी सुख और दु:ख को

एकही पलडे में तोलना..!!!





झुळुक

शब्द मनाशी भांडले की
पाना पानात सांडतात
त्यावरले दोन हळवे थेंब
पुसून ती रांगोळी..
विस्कटत ओळी
पुसट होत जातात
पुन्हा मनाचे पान कोरे होते म्हणत... ....

जाउदे या शब्दांपेक्षा मौन व्रतच बरे होते !!!

झुळुक

सायंकाळच्या किरणांसारखे
शब्द आक्रसुन घेतात अर्थ
सारी भावना वितळत जाते
मौनाच्या अंधारात...
अन कविता होते व्यर्थ!
रात्रीच्या जगात उरतात जसे निस्तेज आकार..
तसे शब्दांचे अर्थहिन आकार
नुसतेच कागदावर साकार

तेव्हा वाट पहावीच लागते उजाडायची...!!!

Tuesday 25 September 2007

पल पल दिल के पास

मिले मिले दो बदन

खिले खिले दो चमन....

ये जिंदगी कम ही सही कोई गम नही....


धरम आणि राखी गुंडापासुन लपत छपत आणि

एका अडचणीच्या ठिकाणी:) (आजकालच्या दिगदर्शकाने इथे गाण्याची आणि रोमान्स ची वाट लावली असती..) पण दिग्दर्शकाने एक सुखद धक्का दिला. खरतर चुकुन हे गाणे पाहण्यात आले आणि मग ते कुठल्या सिनेमा चे हा शोध लागल्यावर मी कपा्ळावर हात मारुन घेतला पण जेव्हा जेव्हा ऐकावीत तेव्हा तेव्हा तेव्हा Black mail ची गाणी वेड लावतात..


देरसे आयी...... आयी तो बहार ....

अंगारो पे सो कर जागा प्यार

तुफ़ानो मे फ़ुल खिलाये...

कैसा ये मिलन..

मिले मिले दो बदन ..

खिले खिले दो चमन

ये जिंदगी कम ही सही कोई गम नही....


ेराखी आणि धर्मेन्द्र चेहयावर सुंदर expression देतात.

राखी दिसतेही सुंदर आणि सोबत आता तीला तीचा आवाज नसल्याने आपल्यालाही बरे वाटते आणि धर्मेंद्रला ही...!


होठ वहि है, है वही मुस्कान

अब तक क्यो कर दबे रहे अरमान

बिते दिने को भुल ही जाये...

अब हम तुम सजन....

मिले मिले दो बदन

खिले खिले दो चमन


ये जिंदगी कम ही सही कोई गम नही..

ती दोघ जेव्हा अब जिंदगी कम ही सही म्हणतात ते अगदी सही आहे..

अस वाटुन जात.

(अर्ध्यापे़क्षा कमी कपडे घालुन धान्गड धिंगा करणा-या नव्या नटयानी आणि त्यांना नाचवणा-या नृत्य दिगदर्शकाने हे गाणे नक्की बघावे)


गुंडानी बराच वेळ गाण्यात येउनही गाण रोमँटिक च राहतं.

जेव्हा ऐकाव तेव्हा हे गाण दिवस रोमँटीक करुन टाकत. तसाच आजचा दिवस त्याने केला.
संध्याकाळ झाली आज वाचतच बसलिये. गाणी ऐकत...
एकीकडे पुन्हा वाचयला घेतलेल चौघीजणी आणि वर संपत आलेला समर ..

autumn ची चाहुल हुर हुर लावणारी .
पुन्हा पुन्हा पानगळ आठवत राहणे चांगले नव्हे . पण त्याआधीची ही झाडे रंगवुन टाकतात त्यांच्या रंगात..

आणि ती धुंदी हळु हळु पानगळी सोबत उतरत जाते.

उरते फ़क्त निश्पर्ण निश्प्राण शांतता....
आधी वाटे की कीती हे पानांचे झाडाशी बंध..., किती बांधीलकी .. नक्की कोण कुणाला बांधुन ठेवते कळतच नाही.. झाड पानांना की पान खोडाला...???

आणि अचानक ते लागेबंधे सोडुन ही पाने निघुन जातात अज्ञाताकडे...
पल पल सोबत करणारी पाने सरळ निघुन जातात...